लेखनाने माणसाला, माणसाने, माणूस म्हणून जोडून घ्यावे, परस्परांमध्ये आपुलकीचे धागे, अधिक घट्ट व्हावेत, प्रत्येक अस्वस्थ वळणावर त्यांच्यात केवळ संवाद नव्हे तर, सुसंवाद साधला जावा, याच एका आंतरिक जिव्हाळ्याचे होत गेले तर वाचक मनामध्ये समतोल विचारांचा समन्वय साधला जावा, त्यातून आनंद मिळावा, ही भावना लेखनामागे सूत्र रूपाने पाहिजे, लेखन असे असावे, अनेक क्षेत्रातील मान्यवरांसह, वाचकांच्या, उत्साही प्रतिक्रियांनी, प्रतिसादाने, भारावून गेले पाहिजे, लेखनाचा हुरूप वाढला, त्या बळावर खरं पाहता लेखन प्रवाह अखंड सुरू राहतो. इतकेच नव्हे तर, जाणत्या वाचकांच्या आग्रहामुळेच, हे लेख उत्तम स्वरूपात आपल्यासमोर येत असतात.
शब्दांकन होणे, त्याचा एक विचार होणं, तो सुविचार होणे, किंवा कुविचार होणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मन, बुद्धी, साधना, प्राप्त परिस्थिती, आणि त्या परिस्थितीला तोंड देताना झालेल्या सगळ्या कृती, यांच्यातून तो विचार हा एखाद्या भूकंपाप्रमाणे, किंवा एखाद्या ज्वालामुखी प्रमाणे, एखाद्या मंथनातून बाहेर आलेल्या हलाहल विषाप्रमाणे, किंवा मंथनातून आलेल्या अमृताप्रमाणे असू शकतो, विचार ही कोणाचीही मक्तेदारी नाही, *एखादा सुविचार लिहितो, कदाचित त्या व्यक्तीला त्या सुविचाराचे त्याच्या जीवनात अंमलबजावणी करता येत नाही, पण दुसरा एखादा त्या विचारांवर अंमलबजावणी करू शकतो, किंवा तिसरी एखादी व्यक्ती त्या सुविचाराचे मर्म स्वीकारून ते सुविचार म्हणजे धन समजून त्याप्रमाणे आयुष्याचे मार्गक्रमण करू शकतो त्यामुळे आपण मांडलेले विचार हे कोणाचीही मक्तेदारी नाही, मी या पुस्तकात मांडलेले विचार आहेत हे विचार कोणीही अमलात आणू शकतात, मला किंवा कोणालाही त्याबद्दल श्रेय देण्याची गरज नाही, त्या विचारांमध्ये आपण हवे ते बदल, सुधारणा, काटछाट, करू शकता. याबाबत लेखकाचे दुमत असणार नाही.
लेखनावरून लेखकाची बुद्धिमत्ता, विचार करण्याची क्षमता, संवेदनशीलता, हे वाचकांच्या चटकन लक्षात येते, आपणच आपल्या लेखाचे गुणगान करणे, तसं चुकीचच भावनेच्या, आवडीच्या, भरात आपण लेखन करतो परंतु ते खरोखरच परिपूर्ण आहे का ! योग्य आहे का ! हे इतरांच्या नजरेतून जाणकारांच्या नजरेतून जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं प्रत्येक लेख लिहीत असताना, प्रत्येक शब्दाची ताकद, व त्यातला भाव, किती विशाल आहे, हे लक्षात आलं पाहिजे. भाषा आणि शब्दांमध्ये, मनुष्याचे सर्व भाव व भावना कशाप्रकारे बांधल्या गेल्या आहेत, हे शब्दांवर लेख लिहिताना प्रकर्षाने जाणवते म्हणून आपण जो शब्द उच्चारतो, व प्रत्यक्ष वापरतो, त्या शब्दाला खूप काही किंमत असते मूल्य असते, त्यामुळेच जेव्हा मनुष्य आत्मचिंतन करता करता आत्मशोध घेऊ लागतो, तेव्हा शब्द देखील मोजून मापून वापरायला शिकू लागतो.
माऊलींनी श्री ज्ञानेश्वरी महाराष्ट्राला प्रदान करून मराठी भाषेची उंची गगनाला भिडवली आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरी चे मनन, वाचन, पारायण, निरूपण, जो जो करू पाहतो, त्याचे मन आकाशाच्या दिशेने वाचकाला प्रयोजन प्राप्त करून देते, जीवनात प्रयोजन नसेल तर, ते जीवन निरर्थकच होईल.......
श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा.फो.९९७०७४९१७७