फलटण चौफेर दि १७ जून २०२५
चौधरवाडी ता फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांनी सांगितले पेरणी पूर्वी बिजप्रक्रिया चे फायदे त्यात कीड फुरशी पासून संरक्षण कसे करावे व बीज प्रक्रिया द्वारे उत्पन्न कसे वाढवावे त्यानंतर बीज प्रक्रिया कशी करावी यावर केले प्रातेक्षिक आणि घ्यायची काळजी.पेरणी करण्यापूर्वी शेतकरी बियाणांवर बीजप्रक्रिया करतात. बीज प्रक्रिया हे पेरणीपूर्वी केले जाणारे महत्त्वाचे काम असून यामुळे पिकांच्या उत्पादनात आणि रोगांच्या प्रादुर्भावात फरक पडतो. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्यामुळे पेरणीपूर्वी बियाणांवर बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याविषयी कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषीकन्या कुमारी कदम रोहिणी लक्ष्मण, मलगुंडे प्रतीक्षा संजय, काटकर स्नेहा संजयकुमार,लडकत श्रेया संजय, कांबळे प्रणोती सुनील, जाधव सृष्टी हनुमंत, कांबळे सानिका अमोल या कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे