साखरवाडी(गणेश पवार)
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून २१ मे हा ‘दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त तहसील कार्यालयातील तहसीलदार समीर यादव यांनी तहसील प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. यावेळी फलटणचे तहसीलदार समीर यादव, श्रीमती लावंड, श्रीमती माने, पडळकर, ढाकरे, साळुंखे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू.” अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.
अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.