फलटण चौफेर दि १३ जून २०२५
फडतरवाडी फलटण येथे दिनांक १२ रोजी कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी "विकसित संकल्प कृषी अभियान २०२५/२६" याविषयी माहिती दिली.
विकसित कृषी संकल्प अभियानातुन (Viksit Krushi Sankalp Abhiyan) आधुनिक कृषी तंत्रज्ञान, वातावरणातील बदलानुरूप पिकांचे नवनवीन वाण, रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेतीपध्दती, पिकांच्या उत्पादनवाढीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान,पशुपालन, मत्स्यपालन, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांची माहिती सांगितली.
त्यावेळी कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्त उपस्थित होते.कृषिकन्या अश्विनी महानवर, वैष्णवी चांदगुडे, पायल नाळे, निधी कोडापे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम राबवला. कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यर्थ्याना मार्गदर्शन लाभले.