फलटण चौफेर दि १२ जून २०२५: शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने चौधरवाडी तालुका फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण च्या कृषी कन्यांचे आगमन झाले.ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले
यावेळी चौधरवाडी गावाच्या कृषी सहायिका तृप्ती सुभाष शिंदे तसेच गावाचे सरपंच श्री तुकाराम नामदेव कोकाटे व माजी उपसरपंच रामदास मारुती भोसले तसेच गावाचे ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू. डी.चव्हाण , श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी. निंबाळकर कार्यक्रम समन्वयक प्रा. नितीशा पंडित कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व निलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या कुमारी जाधव सृष्टी हनुमंत , कांबळे प्रणोती सुनील, कांबळे सानिका अमोल ,कदम रोहिणी लक्ष्मण , लडकत श्रेया संजय, मलगुंडे प्रतीक्षा संजय, काटकर स्नेहा संजयकुमार यांनी चौधरवाडी येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले यादरम्यान विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांचे जीवनमान त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थळ गावातील पीक पद्धती नैसर्गिक संशोधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत तसेच शेतकऱ्यांना माती परीक्षण व पाणी परीक्षण विविध पिकांवरील रोग व किड्यांचे व्यवस्थापन, हवामान ,तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल ,या कृषी कन्या शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत, व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषी कन्या शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत.