साखरवाडी (पूढारी वृत्तसेवा) : साखरवाडी , ता . फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचा सन २०२५/२६ साठीचा ऊस वाहतूक कराराचा शुभारंभ आज पाडव्याच्या मुहूर्तावर कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात वाहतूक कंत्राटदार राहुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला . दरम्यान , कंपनीचे संचालक जितेंद्र धारु यांनी मागील गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ७ लाख २२ हजार मेट्रिक टन गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना त्यांची कमिशन डिपॉझिट सहित सर्व देय रक्कम लवकरच अदा करणार असून आगामी गळीत हंगामात कारखाना प्रतिदिन १० हजार मॅट्रिक टन क्षमतेने चालणार असून १२ लाख मे . टन गळीताचे उद्दिष्ठ असून त्या अनुशंगाने तोडणी वाहतूक करार सुरु केले आहेत. तरी तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपल्या वाहनाचा करार विभागीय गट ऑफिसशी संपर्क साधून पूर्ण करुन घ्यावा , असे आवाहन जितेंद्र धारू यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप , केन मॅनेजर सदानंद पाटील ,शेतकी अधिकारी दिगंबर माने,रमेश बागणवर,फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, राजेंद्र भोसले ,गोरख भोसले, गटविभाग अधिकारी पोपट भोसले , सुहास गायकवाड,पै संतोष भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले ,केनयार्ड सुपरवायझर एस के भोसले,महेश पवार,राहुल पवार,विशाल बोन्द्रे,सुरेश भोसले,धनंजय भोसले, विश्वजीत भोसले ,विशाल नलवडे,आकाश जगताप,ऊस तोडणी कंत्राटदार व श्री दत्त इंडिया कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते .