Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नीरा उजवा कालव्यावरील पुलाचा भराव खचला सुरवडी येथील घटना तात्काळ दुरुस्तीची मागणी

 


साखरवाडी गणेश पवार

सुरवडी ता फलटण गावाच्या  हद्दीतून वाहणाऱ्या नीरा उजवा कालव्यावरील पुलावाचा भराव दोन्ही बाजूने खचल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे संबंधित विभागाने या फुलाची तात्काळ दुरुस्ती केली नाही तर भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनधारकांमधून व्यक्त केली जात आहे

 साखरवाडीहून सुरवडी व फलटणला जाण्यासाठी पूर्वी बडेखानमार्गे ८ कि मी लांबचा वळसा घालून जावे लागायचे त्यामुळे ४० वर्षापूर्वी  या ठिकाणी  लाकडी पत्र्याच्या पुलाची पायी व सायकलवरून जाण्यासाठी उभारणी करण्यात आला होता  कालांतराने तो जीर्ण होऊन तो फुल कोसळला तद्नंतर १९९४ साली काँक्रीटच्या फुलाची  या ठिकाणी उभारणी करण्यात आली या पुलावरून  साखरवाडी, होळ, मुरूम, खामगाव या गावांसह इतर गावातील शेकडो वाहनांची रोज वर्दळ असते तसेच साखरवाडी येथील साखर कारखाना व सुरवडी एमआयडीसीतील हजारो चाकरमानी  रोज या पुलावरून ये जा करीत असतात  तालुक्यातील स्वराज, श्रीराम व श्रीदत्त साखर कारखान्याची ऊस वाहतूकही याच पुलावरून होत असते सद्यस्थितीत या पुलाचा भराव दोन्ही बाजूने खचला असल्याने या ठिकाणी अवजड वाहन जाऊन तो भाग कोसळल्यास भविष्यात  फार मोठा अपघात होऊन अनर्थ घडण्याची भीती नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ या फुलाची दुरुस्ती करण्याची मागणी या ठिकाणचे नागरिक व वाहनधारक करीत आहेत

या पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव खचल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता संबंधित विभागाने तात्काळ याची दखल घेऊन दुरुस्ती करावी नितीन जाधव ग्रा प सदस्य सुरवडी


 

 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.