साखरवाडी गणेश पवार नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतील गावांनी दिनांक १५ जून पर्यंत साठवण तलाव व पाणीपुरवठा योजनेच्या टाक्यांमधील पाणी जपून वापरण्याचे निर्देश फलटण पाटबंधारे विभागाकडून संबंधित गावांना देण्यात आले आहेत या मध्ये फलटण नगरपरिषदेसह तालुक्यातील २० गावांचा समावेश असून पाटबंधारे विभागाकडून ग्रामपंचायतींना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नीरा उजवा कालव्यातून करण्यात येणाऱ्या २०२३/२४चे उन्हाळी आवर्तन हे कालवा दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले आहे मात्र तत्पूर्वी आपल्या गावातील पाणी साठवण टाक्या व तलावांमध्ये १००टक्के पाणीपुरवठा नीरा उजवा कालव्यातून उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यामुळे दिनांक १५ जून पर्यंत आपल्या साठवण तलाव व पाण्याच्या टाकीतील पाणी जपून वापरावे कारण १० जून पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे