फलटण चौफेर दि २५ जून २०२५
नीरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये सध्या एकूण २०.१३६ टीएमसी (टक्केवारीने ४१.६६%) पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्थिती समाधानकारक आहे. मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा केवळ ५.०७९ टीएमसी (१०.५१%) इतका होता.आज सकाळी ६ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वीर धरणातून तब्बल २९,२९७ क्युसेसचा विसर्ग सुरू आहे, ज्यामध्ये स्पिलवेने २७,७९७ क्युसेस आणि ईस्केपमार्गे १,४०० क्युसेसचा समावेश आहे. यामधून नीरा डावा कालवा ६०० क्युसेस आणि नीरा उजवा कालवा १,२०४ क्युसेसने सुरु आहे.
प्रमुख धरणांचा सविस्तर आढावा:
भाटघर धरणपर्जन्यमान: २८ मिमीएकूण साठा: ७.३८३ टीएमसी (३१.४३%)येणारा विसर्ग: +१६१७ क्युसेस
नीरा देवघर धरणपर्जन्यमान: ४३ मिमीएकूण साठा: ३.४३९ टीएमसी (२९.३२%)येणारा विसर्ग: +१७२ क्युसेस
वीर धरणपर्जन्यमान: ० मिमीएकूण साठा: ७.३३८ टीएमसी (७८%)येणारा विसर्ग: +१२९६ क्युसेस
गुंजवणी धरण पर्जन्यमान: ८२ मिमी एकूण साठा: १.९७० टीएमसी (५३.४०%)येणारा विसर्ग: +२२३ क्युसेस
एकूण चारही धरणांतील इनफ्लो: ३.३०८ टीएमसी
संपूर्ण नीरा खोऱ्यात समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये चांगला साठा निर्माण झाला आहे. मात्र वीर धरणातून वाढलेला विसर्ग लक्षात घेता, नदी किनारी वसलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.