Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीर धरणातून २१ हजार विसर्ग : नागरिकांना खबरदारीची सूचना

 


    संग्रहित चित्र

फलटण चौफेर दि २४ जून २०२५

पुरंदर तालुक्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.



आज दिनांक २४ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजता वीर धरणाच्या सांडव्या द्वारे २०९६० क्यूसेक्स आणि वीज निर्मिती केंद्राद्वारे १४०० क्यूसेक्स असा एकूण २३३६०क्यूसेक्स विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.



धरण क्षेत्रात पावसाचा जोर आणि विसर्गाचे प्रमाण यानुसार आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अधिक सावध राहावे. नदी पात्रात कोणताही व्यक्ती, पंप, जनावरे किंवा साहित्य असल्यास तात्काळ बाहेर काढण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.