फलटण चौफेर दि २१ जून २०२५
साखरवाडी ता फलटण येथील श्री स्वामी समर्थ सायकल क्लब, साखरवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वारीचे हे यंदाचे तिसरे वर्ष होते.
यंदा सायकल वारीमध्ये प्रदीप भोसले,सोमनाथ माने,राजेंद्र इमडे,गोपाळ कांबळे,रविंद्र संकपाळ,पोपट पवार,अनिल जाधव,तानाजी पवार,अक्षय गाडे,दीपक भोसलेया सर्व सायकलप्रेमींनी साखरवाडी ते पंढरपूर हा प्रवास सायकलवर यशस्वीरित्या पूर्ण केला. सायकल वारी दरम्यान सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि "हरी विठ्ठल"च्या जयघोषात पंढरपूरमध्ये दाखल झाले.
या उपक्रमामागील उद्देश केवळ धार्मिक यात्रेपुरता मर्यादित नसून, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जपणे आणि सायकलिंगच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश देणे हा आहे. तसेच तरुण पिढीमध्ये सायकलिंगविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा उद्दात हेतू या वारीमागे आहे.श्री स्वामी समर्थ सायकल क्लबने याआधीच्या वर्षांमध्येही अनुशासनबद्ध आणि उत्साही सायकल वारीचे आयोजन केले असून, यंदाही त्यांनी ती परंपरा यशस्वीपणे पुढे चालू ठेवली आहे. भविष्यातही अधिक लोकांनी या वारीमध्ये सहभागी व्हावे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजात पोहोचवावा, असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.