फलटण चौफेर दि १३ जून २०२५
लोणंद येथील आयटीआय मधे शिकत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे काळजच्या चौकात पाचजणांकडून अपहरण करण्यात आलेले त्याची लोणंद पोलीसांनी रात्री पावणे अकराच्या दरम्यान सुटका केली.याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोणंद येथील आयटीआय मधे शिकत असलेला जिंती ता फलटण येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलास मित्राच्या मोटारसायकलवरून घरी जात असताना साखरवाडी येथील पाचजणांकडून संध्याकाळी ५ वाजता काळज येथील तडवळे फाट्याजवळ स्पीड ब्रेकरपाशी गाडी हळू झाल्याचा फायदा घेत अडवून जबरदस्तीने उतरवून दोन दुचाकीवरून आलेल्या पाचजणांकडून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले.
सदर अपहरणाची माहीती मिळताच लोणंदचे सपोनि सुशील भोसले पोलीस हवा. विठ्ठल काळे, बापू मदने यांच्या टिमने अपहृताच्या शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी वाणेवाडी कोर्हाळे लाटे खुटे होळ असा फिरत पोलीसांच्या भीतीने शेवटी खुंटे येथे संबंधित अल्पवयीन मुलास सोडून दिले. पोलीसांकडून तिथे पोहचत रात्री पावणेअकरा वाजता त्याचा ताबा घेतला.
लोणंद पोलिसात अपहृत मुलाचे वडील प्रमोद रनवरे यांनी अपहरण करणाऱ्या साखरवाडी तालुका फलटण येथील ५ जणांच्या विरोधात लोणंद पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सदर पाचही संशयित फरार असून लोणंद पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत. अपहृत अल्पवयीन मुलाची आणि साखरवाडी येथील मुलांची २६ एप्रिल रोजी जिंती येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बाचाबाची झाली होती. याच भांडणाचा राग मनात धरुन सदर अपहरणनाट्य झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले