फलटण चौफेर दि २८ मे ३२०२५
नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये सध्या एकूण ७.४२२ टीएमसी म्हणजेच १५.३६ टक्के पाणीसाठा असून, यंदा गतवर्षीच्या तुलनेत स्थिती समाधानकारक आहे. मागील वर्षी याच दिवशी साठा ४.९१२ टीएमसी म्हणजेच १०.१६ टक्के इतका होता.
धरणानुसार भाटघर धरणात सध्या पावसाची नोंद नाही. एकूण साठा १.६८० टीएमसी (७.१५%), सध्या विसर्ग नाही नीरा देवघरमध्ये देखील पावसाचा अभाव असून, साठा १.०६४ टीएमसी (९.०७%) इतका आहे.वीर धरणात ० मिमी पाऊस असून, ३.८९८ टीएमसी (४१.४४%) साठा आहे. या धरणात सर्वाधिक साठा असून, १३६ क्युसेक्सने पाणी येत आहे.गुंजवणी धरणात ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साठा ०.७७९ टीएमसी (२१.१०%) असून, ७ क्युसेक्सचा इनफ्लो आहे.
एकूण चार धरणांमधील इनफ्लो सध्या ०.१३६ टीएमसी इतका आहे.तर नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद असून नीरा उजवा कालव्यात ७०२ क्यूसेक विसर्ग सुरू आहे