फलटण चौफेर दि ३० मे २०२५
मागील आठवड्यात सातारा जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी झाली सातारा जिल्ह्याचा मे महिन्याच्या पाऊस काळ पहिला तर सरासरीच्या सात ते आठ पट पाऊस झाला आहे या मध्ये फलटणचा विचार केला तर एका वर्षात पडणाऱ्या पावसाच्या ९५ टक्के पाऊस तीन दिवसात झाला आहे फलटणच्या सर्वच मंडला मध्ये अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे या काळात पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू असून सर्व शासकीय यंत्रणा फिल्डवर आहे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान फलटण तालुक्याचे झाले आहे असे फलटण येथे पूर परिस्थिची व नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
यावेळी फलटण कोरेगाव चे आमदार सचिन पाटील मा खासदार रणजितसिंह ना निंबाळकर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोषी ,प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव जिल्हा बॕकेचे संचालक शिवरुपराजे खर्ङेकर ,साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले,यांची प्रमुख उपस्थिती होती