फलटण चौफेर दि ३० मे २०२५
नीरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये सध्या पावसाचा अभाव जाणवत असूनही साठवलेला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार एकूण ७.५५० टीएमसी पाणी असून १५.६२ टक्के इतका आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी केवळ ४.९०८ टीएमसी १०.१६% पाणीसाठा होता.
धरणनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे:
भाटघर धरण: आज पावसाची नोंद शून्य. एकूण साठा १.६८० टीएमसी (७.१५%). धरणात नवीन काहीही आवक नाही.
निरा देवघर धरण: पावसाची नोंद नाही. एकूण साठा १.०८२ टीएमसी (९.२२%). आजचा प्रवाह +१८ क्यूसेक्स.
गुंजवणी धरण: आज पावसाची नोंद नाही. साठा ०.७९३ टीएमसी (२१.४९%), प्रवाह ०७ क्यूसेक्स.
वीर धरण: पाऊस नाही. एकूण साठा ३.९९४ टीएमसी (४२.४५%), जो या चारही धरणांपैकी सर्वाधिक आहे. आजची आवक +११९ क्यूसेक्स. विसर्ग नाही.
नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असून उजव्या जलव्यातून ७०२ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे
चारही धरणांची मिळून आजची एकूण आवक ०.१४४ टीएमसी इतकी झाली आहे.