फलटण चौफेर दि १३ फेब्रुवारी २०२५
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार फलटण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचा लाभ घेणा-या सर्व शिधापत्रिका धारकांनी आपल्या शिधापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्ती आहेत. त्या सर्वांचे आधारकार्ड घेऊन आपल्या रास्तभाव दुकानदाराकडे जाऊन २८ फेब्रुवारी पर्यंत त्यांचे सत्यापन (व्हेरीफीकेशन) करुन घेणे सक्तीचे असल्याचे फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी सांगितले आहे तसेच ज्या व्यक्तींचे आधार सत्यापन (व्हेरीफीकेशन) होणार नाही, त्यांचे शिधापत्रिकेमधून नाव वगळले गेल्यास किंवा त्यांचा लाभ बंद झाल्यास, सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिधापत्रिका धारकाची राहील, यांची कृपया नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे,तसेच आपल्या शिधापत्रिका मधील जे सदस्य मयत आहेत परंतु त्यांचे नाव शिधापत्रिकेमधुन वगळन्यात आलेले नाही अशा सदस्याचे नाव तात्काळ कमी करुन घेण्यासाठी मयत व्यक्तीचा मृत्युदाखला, आधारकार्ड व शिधापत्रिका घेऊन तहसिल कार्यालय फलटण (पुरवठा शाखा) येथे संपर्क साधावा, असे आवाहन देखील तहसिलदार अभिजीत जाधव यांनी केले आहे