फलटण चौफेर दि. ८ जून २०२५
मागील २४ तासांत नीरा खोऱ्यातील धरण परिसरात अल्प पावसाची नोंद झाली असून काही धरणांमध्ये पाणीसाठ्यात सौम्य वाढ झाली आहे. एकूण ४ धरणांमध्ये मिळून ०.०९१ टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे तर नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन बंद करण्यात आले आहे
धरणानिहाय पावसाचा व साठ्याचा तपशील:
भाटघर धरण:
पावसाची नोंद – ५ मिमी
एकूण पाणीसाठा – ५१ मिमी
साठा – १.७०२ टीएमसी (७.२४%)
नवीन आवक – शून्य
नीरा देवघर धरण:
पावसाची नोंद – १८ मिमी
एकूण पाणीसाठा – ३८ मिमी
साठा – १.१३६ टीएमसी (९.६८%)
नवीन आवक – शून्य
वीर धरण:
पावसाची नोंद – १२ मिमी
एकूण पाणीसाठा – ३२ मिमी
साठा – ३.९५६ टीएमसी (४२.६४%)
नवीन आवक – ७५ क्युसेक्स
विसर्ग – शून्य
गुंजवणी धरण:
पावसाची नोंद – २१ मिमी
एकूण पाणीसाठा – ७० मिमी
साठा – ०.८२१ टीएमसी (२२.२६%)
नवीन आवक – ७ क्युसेक्स
पाणीसोड – शून्य
एकूण चार धरणांतील साठा:
सध्याचा एकूण साठा – ७.६१६ टीएमसी (१५.७६%)
गतवर्षी याच दिवशी साठा – ४.५९० टीएमसी (९.५०%)
सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून मान्सूनपूर्व पावसामुळे काहीशी दिलासा देणारी परिस्थिती आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असून शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे जलसंपदा विभागाने आवाहन केले आहे.