Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीर धरणातून विसर्ग सुरू होणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 





फलटण चौफेर, दि. १९ जून २०२५

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. परिणामी,उद्या दि २० रोजी सकाळी ६वाजता वीर धरणातून नीराचा २ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.



पाटबंधारे विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून विसर्गात  वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर धरणाखालील परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतत घोषणांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.



प्रशासनाने स्थानिक पातळीवर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असून, नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.