Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरायची तयारी- श्रीमंत संजीवराजे

  


फलटण चौफेर दि १७ एप्रिल २०२५

फलटण, खंडाळा तालुक्याचं हक्काचं नीरा देवघरच्या लाभ क्षेत्रातील पाणी   इतर तालुक्याला देण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे जर असं झालं  तर तालुक्याच्या हक्काचं पाणी वाचवण्यासाठी वेळप्रसंगी  रस्त्यावर  संघर्ष करावा लागला तरी  करणार तसेच श्रीमंत रामराजे यांच्या मार्फत लवकरच जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तूनिष्ठ आकडेवारी दाखवणार असून ते जर अन्यायच करणार असतील तर यासाठी संघर्ष अटळ असल्याच प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी 'लक्ष्मी विलास' या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केले  यावेळी  माजी आमदार दीपक चव्हाण,मा जि प सदस्य धैर्यशील (बापू)अनपट,पं.सं. माजी सभापती शंकरराव माडकर,श्रीरामचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती 

संजीवराजे म्हणाले, मागील काळात आपण सत्तेत असल्यामुळे पाण्यासाठी आतापर्यंत संघर्ष करावा लागला नव्हता मात्र आता शिल्लक ३ टीएमसीर पाणी खंडाळा,फलटण तालुका सोडून इतरत्र जाणार असेल व फलटण तालुक्यातील ४२ व खंडाळा तालुक्यातील ४० टक्के क्षेत्र अजूनही ओलीताखाली आले नसल्याने  फलटण, खंडाळा,माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी एकत्रित येत याविरोधात उभे राहणे  गरजेचे आहे कोळकी,जाधववाडी,साखरवाडी व विडणी या ठिकाणी नगरपंचायती होणे गरजेचे आहे.यासाठी आम्ही आमच्या काळामध्ये सदरील प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे दिलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये कोळकी गावातील काही भाग फलटणला जोडण्याचा प्रयत्न केला जात होता; परंतु त्यावेळी आम्ही यास विरोध करून कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहण्यासाठी नगरपंचायत करण्यात यावी, असा प्रस्ताव केलेला आहे. त्यामुळे जर नगरपंचायत होत असेल तर आनंदच आहे, परंतु तो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे

दीपक चव्हाण  म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात रामराजे हे विधान परिषदेचे सभापती असताना सिंचन योजना राबविण्याची मान्यता घेतली होती. मात्र दुर्दैवाने पुढे आघाडी सरकार पडले.  त्यानंतर चे काम हे नंतरच्या काळात झाले. मात्र  त्याच श्रेय दुसरेच कोणी घेत आहेत. पाणी अडवण्याचा दृष्टीने रामराजे नाईक-निंबाळकर मंत्री असताना कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यावर निरा देवघर सह अनेक प्रकल्प त्या काळी सुरू झाले. धरणे बांधून ते पाणी वाघोशी पर्यंत आणण्यासाठी रामराजेंनी मोठा संघर्ष केला असल्याची आठवण करून देताना आमच्या कार्यकाळतील प्रस्तावत कामे रद्द व्हावीत म्हणून आताचे आमदार सचिन पाटील यांनी शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे संपूर्ण राज्यात निवडणूक आलेल्या आमदारांपैकी हे एकमेव आमदार असतील जे मतदार संघातील कामे होऊ नयेत म्हणून पत्र देत आहेत त्यांनी जुनी कामे न थांबवता नवीन अधिक काम  मंजूर करून आणावीत त्यांच्या पत्र व्यवहारामुळे २५/१५ मधील  वर्क ऑर्डर न निघालेली अनेक काम आज थांबली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.