फलटण चौफेर दि २७ नोव्हेंबर २०२४ जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे संशयित तय्यब आदम कुरेशी यय- ४५ वर्षे, आरीस गफुर कुरेशी यय-३६ वर्षे, बिलाल रफिक कुरेशी वय-३४ वर्षे, झिशान ऊर्फ दिशान इमाम बेलारी ऊर्फ कुरेशी वय २० वर्ष,आबू ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी वय २६ वर्षे, सर्व रा. कुरेशीनगर फलटण यांचा समावेश आहे संशयतांवर गोवंशीय जनावरांची कत्तल करणे कत्तलीसाठी वाहतूक करणे, कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करणेस मनाई असताना देखील यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गोवंशीय जनावरांची कतलीसाठी वाहतुक करताना मिळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होते फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हातून तसेच सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, व पुणे जिल्हयातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती संशयतांवर दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नसल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले याप्रकरणी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हया प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो.हवा बापू धायगुडे, सचिन जगताप, पो.कॉ जितेंद्र टिके, यांनी योग्य पुरावा सादर केला