फलटण चौफेर दि १९ साखरवाडी विद्यालयात शाळेच्या मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. इयत्ता नववीच्या चारी तुकड्यांमधून एकूण १६ विध्यार्थी मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत उमेदवार होते. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानातून या सात विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळासाठी निवड केली. साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उर्मिला जगदाळे मॅडम यांच्या संकल्पनेतून समाजशास्त्र विभागाच्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.पर्यवेक्षक तुळशीदास बागडे सर व समाजशास्त्र विषय प्रमुख सुनील भोसले सर आणि विद्यालयातील सर्व समाजशास्त्र विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी यासाठी सहकार्य केले. या निवडणुकीमध्ये वेदांत रुपनवर, श्रेया शिंदे, धनराज भोसले, प्रज्ञा पवार दिशा रणदिवे, श्रावणी गायकवाड आणि साईराज इंगळे हे विद्यार्थी विजयी झाले सर्व विजयी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले