साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
साखरवाडी ता फलटण येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता देण्याच्या विचाराधीन असून 16 फेब्रुवारी नंतर गळीतास आलेल्या ऊसाची बिले 7 दिवसात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे कंपनीचे संचालक जितेंद्र धारू यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
साखरवाडी चा कारखाना स्थापन झालेपासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त गळीत हंगामा मध्ये मध्ये ३१ जानेवारी पर्यंत 4 लाख 61 हजार टन गाळप झाले असून याचे बिल प्रती टन 2772 प्रमाणे अदा करण्यात आलेले आहे . फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल दि 27 रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल तसेच व 16 फेब्रुवारी पासून गळीतास येणाऱ्या ऊसाचे बिल ऊस गळीतास आल्या पासून दर 7 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल . यावर्षीच्या गळीत हंगामा मध्ये कारखाण्यास गळीतास आलेल्या ऊसास चांगली रिकव्हरी येत असल्याने गळीतास आलेल्या ऊसास व गळीतास येणाऱ्या ऊसास दुसरा हप्ता देण्यास कंपनी विचारधीन आहे . तरी वरील सर्व बाबींचा विचार करिता परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधूनी त्यांच्याकडे असणारा सर्व ऊस आमचे कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे मागील तीनही गळीत हंगामात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वतोपरी श्री दत्त इंडिया प्रा लि , साखरवाडी या साखर कारखान्यास सहकार्य केले त्या बद्दल सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे कंपनी प्रशासन आभारी आहे . या पुढेही असेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.