Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्घाटन शिवरायांच्या, अश्वारूढ पुतळ्याचे.......!

 



शिवरायांचे आठवावे रूप,

शिवरायांचा आठवावा प्रताप,

शिवरायांसारख्या महापुरुषाचे अंतकरण,  त्यांची स्फूर्ती, त्यांच्या प्रेरणा, त्यांचे ध्येय, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा विचार, आणि कृती मागील आशय, जाणण्यासाठी आपल्या देह, मन बुद्धी, आणि आत्म्याची शुद्धी, व्हायला हवी. 

राजा आणि सकळ सुखांचा त्याग, ही कल्पना सुद्धा आजच्या काळात असंभव वाटणारी आहे,

 श्री शिवछत्रपती हे त्याचे मूर्तीमंत प्रतीक आहेत, वैयक्तिक सुखाचा स्वतः त्याग करून, राष्ट्रधर्माच्या हितासाठी, सर्वस्वाचा त्याग करणारी, माणसे, श्री शिवरायांनी घडवली.

श्री शिवछत्रपतींनी राज्यभोग घेतला नाही, तर राजयोग साधला. हिंदवी राज्य स्थापने, चालवणे, त्याचा विस्तार करणे, ही त्यांची साधना होती. शक्ती, युक्ती, बुद्धी, भक्ती, विवेक, आणि वैराग्य या षडगुण ऐश्वर्याने संपन्न असा हा, श्री समर्थांचे मन जिंकलेला, श्रीमंत योगी होता, सकल जणांचा भगवान होता.

श्री शिवाजी महाराज म्हणजे आपल्या राष्ट्राचे दैवत,

शिवरायांना आपण एक चमत्कारी पुरुष, म्हणून न पाहता, ते माणूस म्हणून कसे होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचे अष्टपैलूत्व कौशल्य, आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, आपापसात बंधुभाव जोपासून, आपले राष्ट्र प्रगतीपथावर कसे राहील, याचा विचार सातत्याने व्हायला हवा ! 

थोडक्यात डोळसपणे शिवरायांना समजून घेणे, व त्याप्रमाणे आचरण केले तर, हाच मार्ग आपल्याला व राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकतो.

शिवाजी महाराजांनी संतांचा उपदेश आपल्या जीवनात आचरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आपणही शिवरायांचीच लेकरे आहोत, त्यांचा वसा आपण उचलला पाहिजे, त्यांचे विचार हृदयाची कवटाळून ठेवले पाहिजेत, यामध्ये आपले व आपल्या राष्ट्राचे हित आहे.

शिवराय म्हणजे आकाशात तेजाने तळपणारा सूर्य आहेत, आणि त्यांचे चरित्र म्हणजे सदगुणांचा दिव्य प्रकाश आहे. सूर्यनारायणाची किरणे ज्याप्रमाणे अनंतात आहेत, त्याचप्रमाणे शिवरायांचे आचरण जगाला नेहमीच प्रेरणा देत आलेले आहे, आणि यापुढेही देत राहतील,

हेच ध्येय मनाशी बाळगून, साखरवाडी ग्रामपंचायती समोर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा, शिवाजी महाराजांचे थेट वंशज, सातारचे राजे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, ( खासदार सातारा लोकसभा मतदारसंघ ) यांच्या शुभहस्ते, व माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण ( मा. सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली व तालुक्यातील व साखरवाडीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत, आज दिनांक २१ ऑगस्ट रोजी बहुसंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत, अत्यंत दिमागदार सोहळ्यात शिवगर्जनेत पार पडले, 

असे छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती चे अध्यक्ष, माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात, साखरवाडीतील अश्वारूढ पुतळा, हा फलटण तालुक्यातील सगळ्यात मोठा असुन हे साखरवाडीकरांचे भाग्य आहे, व या पुतळ्याचे अनावरण शिवरायांचे थेट वंशज, माननीय, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, यांच्या हस्ते झाले हे आपले परमभाग्य आहे, असे गौरवोद्गागार काढले. 

शिवरायांचे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू धुरंदर राजनीतिज्ञ, कुशल युद्धनीतीज्ञ, श्रेष्ठ समानीतीज्ञ, कणखर नेतृत्व, रयतेचा राजा, आपल्या राज्यातील स्त्रियांना सन्मान देऊन त्यांच्या इज्जतीचे रक्षण केले त्यांचे हेच ध्येय, मनी बाळगून, शिवरायांच्या तेजस्वी प्रतिमेला वंदन करू, हीच महाराजांना आपण वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल, व हा पुतळा आपणास प्रेरणादायी ठरेल , या प्रेरणेतूनच स्वातंत्र्याचा मार्ग आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवीत राहील.

जय भवानी, जय शिवराय




श्री. रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण. जि. सातारा. फोन ९९७०७४९१७७

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.