गोखळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक (PSI)पदी विराज गजानन गावडे, स्थापत्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर पदी निखिल ज्ञानेश्वर गावडे यांची , गव्हर्मेंट लॅब असिस्टंट मुंबई पदावर रोहित शुक्राचार्य भारती, एस. आर. पी. एफ. दौंड (महाराष्ट्र पोलीस) चि.तेजस गोकुळदास कांबळे आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये 'आरोग्य सेविका' पदी कोमल बाळासाहेब जगताप, व रोहिणी सदाशिव कोठावळे यांची निवड झाल्याबद्दल गोखळी ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव आणि हर घर झाडं " गोखळीकरांचा स्तुत्य उपक्रम असल्याचे फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी गौरवदगार काढले. या कार्यक्रमात डॉ अभिजीत जाधव बोलत होते.यावेळी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे , संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व खटकेवस्ती चे सरपंच बापूराव गावडे , मातोश्री विकास सोसायटी भाडळी खुर्द चे संस्थापक चेअरमन मोहन डांगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव बापू गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, मा. सरपंच सौ सुमनताई गावडे, श्रीराम बझाचे संचालक मारुती बापू गावडे, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक तानाजी गावडे पाटील,गोखळी विकास सोसायटीचे मा. चेअरमन तानाजी बापू गावडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बजरंग गावडे, मा जि. प.सदस्य विश्वास दादा गावडे, माजी सरपंच अमित भैया गावडे, गोखळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे. रमेश दादा गावडे.गोखळी सोसायटीचे संचालक बाळासाहेब गावडे, उदयसिंह गावडे.भाजपा अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष पिंटू जगताप. संतोष दादा गावडे, राधेश्याम जाधव, मा.उपसरपंच अभिजीत जगताप. पोलीस पाटील विकास शिंदे. प्रसाद जाधव.चांगदेव शिरतोडे.प्रमोद गेजगे.हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळीचे प्राचार्य सुनील सस्ते, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले, पंचबिघा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर शेख यांच्या सह गोखळी पंचबिघा, खटकेवस्ती, गवळीनगर, जगतापवस्ती परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पुजन आणि दिपप्रज्वलन करून झाले. श्रावण मास आरंभ निमित्त ग्रंथ वाटप आणि " हर घर झाडं" उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांचे हस्ते करण्यात आले.
जनसेवक सागर गावडे पाटील यांच्या अभिष्टचंतना निमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन प्रा. पाटील सर व प्रा.विशाल चव्हाण सर यांनी व्याख्यान दिले.भव्य तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन कुमारी राजनंदिनी विठ्ठल पडर व कु.आदित्य रामदास कदम या चिमुकल्या चे भाषण घेऊन करण्यात आले. तहसीलदार डॉ अभिजीत जाधव आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सदर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोगतात बद्दल अभिनंदन करुन प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला.वेळेअभावी इतर स्पर्धकांची पुढील आठवड्यात भाषणे घेण्यात येईल असे संयोजकांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम जाधव यांनी केले तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक सस्ते सर यांनी मानले.