साखरवाडी गणेश पवार
भिलकटी तालुका फलटण येथे निरा उजवा कालव्यामध्ये दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गावातीलच राजू (वय 45)पूर्ण नाव माहित नाही यांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडलीअसून मागील काही दिवसांपासून सदर व्यक्ती भिलकटी गावात भिक मागून राहत होती.सदर घटनेची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे गुन्ह्याची फिर्याद पोलीस पाटील शांताराम काळेल यांनी दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव करीत आहेत