Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीकर राजेंना त्यांच्या कर्तुत्वाची जागा दाखवतील - खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर vidani

 



विडणी ( योगेश निकाळजे ) - कोणतेही काम करायच नाही मोठमोठी नावे घेऊन फक्त गोडगोड बोलायच व आपण किती सुसंस्कृत आहोत हे लोकांना सांगायच तुमची संस्कृती ऐकण्यासाठी लोकांची तीस वर्षे वाया गेली असून आता राजेंना त्यांच्या कर्तुत्वाची जागा दाखवा असे आवाहन माढा लोकसभा खासदार रणजीतदादा नाईक निंबाळकर यांनी विडणी येथील प्रचारसभेत केले.

   विडणी ता. फलटण येथील विडणी विकास सोसायटीची सन२०२३ची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि.१९ रोजी होणार असून भाजपप्रणित विडणी विकास आघाडीच्या प्रचाराच्या सांगता सभेत खा.रणजीतदादा नाईक निंबाळकर बोलत होते,या कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अनुप शहा,सरपंच सागर अभंग,बजरंग गावडे, माऊली नाळे,विजय अभंग,विठ्ठल नाळे, अंकुशराव नाळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.


     फलटण तालुक्यातील लोकांनी आता सत्ता बदलायचे ठरवले असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी सत्ताबदल होत आहे,लवकरच आपण फलटणचा बारामतीसारखा विकास करणार असल्याचे सांगून रणजीतदादा पुढे म्हणाले की आपण विडणी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे आता सोसायटीवरही आपलीच सत्ता येणार आहे ही निवडणूक सर्वसामान्य विरुद्ध धनदांडग्यांची असून मतदार आता या धनदांडग्यांना न भुलता आपल्या विडणी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देणार असल्याने आता विरोधकांच्या डोक्यात शिट्टी वाजली आहे, विडणीच्या विकासाची गाडी सुसाट सुरु झाली असून आता काळी मांजरे  आडवी जातील मात्र त्यांना आता घाबरण्याचेही कारण नाही, विडणी सोसायटीतही परिवर्तन होणार असून विडणीचा आणखीन मोठा विकास होईल असेही मत यावेळी खा.रणजीतदादा यांनी व्यक्त केले.

     श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व आताचे निंबाळकर यांच्या विचारात जमीन आसमानचा फरक असून श्रीमंत मालोजीराजे हे केवळ जनतेसाठी जगले मात्र आताचे केवळ स्वार्थासाठीच जगतात असा टोला अनुप शहा यांनी राजेंना लगावला.

      यावेळी सरपंच सागर अभंग यांनी सांगितले की, विरोधकांना सोसायटीच्या निवडणूकीत साधा जाहीरनामाही काढता आला नाही, गेली अनेक वर्षे सोसायटीत एकहातीसत्ता असतानाही त्यांना विकास करता आला नाही उलट सोसायटीच्या मालकीचे कापड दुकान विकले, मार्केट यार्डातील गाळेही विकले, आडत दुकानही विकले यांनी फक्त विकायचीच कामे केली असून आता विडणीतील जनता त्यांना माफ करणार नसून सोसायटीमध्ये आता परिवर्तन अटळ आहे, केंद्रात, राज्यात व गावात आपलेच सरकार असल्याने गावचा विकास होत असून तालुक्यात बदलाच्या वारे विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने विरोधकांच्या आता पायाखालची वाळू निसटू लागली आहे, आता ही सोसायटी सर्वसामान्यांच्या हाती देण्यासाठी विडणी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.


    यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली या कार्यक्रमास मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.