फलटण चौफेर दि ५ जून २०२५
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नीरा खोऱ्यातील काही भागात हलक्या सरी पडल्याने प्रमुख चार धरणांमध्ये साठ्यात वाढ होत आहे. आज सकाळी ६ वाजता घेतलेल्या पाणलोट क्षेत्राच्या नोंदीनुसार, एकूण साठा ७.५१६ टीएमसी (१५.५५%) इतका झाला असून तो गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त ४.६६१ टीएमसी (९.६४%) होता.
नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये झालेली सध्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:
भाटघर धरण
– आजचा पाऊस: २९ मिमी
– एकूण पाऊस: ३३ मिमी
– साठा: १.६८० टीएमसी (७.१५%)
– साठा वाढ: ०
नीरा देवघर धरण
– आजचा पाऊस: १२ मिमी
– एकूण पाऊस: १९ मिमी
– साठा: १.११८ टीएमसी (९.५३%)
– साठा वाढ: +९
वीर धरण
– आजचा पाऊस: ५ मिमी
– एकूण पाऊस: ५ मिमी
– साठा: ३.९१७ टीएमसी (४१.६४%)
– साठा वाढ: +६१
– नीरा डावा कालवा विसर्ग बंद
-नीरा उजवा कालवा ७०२
गुंजवणी धरण
– आजचा पाऊस: १० मिमी
– एकूण पाऊस: ३४ मिमी
– साठा: ०.८०० टीएमसी (२१.४९%)
– साठा वाढ: ०
चारही धरणांचा मिळून एकूण आजचा जलप्रवाह: ०.०७० टीएमसी
एकूण साठा: ७.५१६ टीएमसी (१५.५५%)
गेल्या वर्षी याच दिवशी: ४.६६१ टीएमसी (९.६४%)
शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण
सध्या कमी पावसातही वीर आणि गुंजवणी धरणात लक्षणीय साठा दिसून येत आहे. नीरा देवघर धरणातही साठा वाढलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजान