फलटण चौफेर दि ९ जून २०२५
साखरवाडीसह परिसरातील गावांमधून मागील काही दिवसांपासून जिओ मोबाईलची रेंज अचानक 'गुल' होत असल्याने मोबाईल धारकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे मोबाईल रेंज गुल झाल्याने फोन न लागणे,लागलाच तर आवाज कट होणे,फोन अचानक कट होणे तसेच ब्रॉडबँड सेवा खंडित झाल्याने बँकांसहित इतर ऑफिस व सेतू मधील ऑनलाईनची कामे खोळंबत असून नागरिकांना यामुळे बँकांमध्ये व पोस्ट ऑफिस मध्ये ताटकळत उभे रहावे लागत आहे त्यामुळे मोबाईल धारकांबरोबरच बँकेमध्ये जाणारे नागरिक व ऑनलाईनची कामे करून घेताना नागरिकांना या खंडित सेवेचा फटका बसत असून संबंधित विभागाने तातडीने याची दखल घेऊन सेवेमध्ये सुधारणा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे
रविवारी साखरवाडीचा आठवडी बाजार असतो यादिवशी आजूबाजूच्या किमान १० ते १५ गावातील नागरिक साखरवाडीला आठवडी बाजारासाठी येत असतात आता बऱ्यापैकी देवाण घेवाण ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने व्यापारी,भाजी विक्रेते व ग्राहक यांना 'रेंज' गुलचा मोठा फटका बसत आहे
साखरवाडी परिसरात दोन ते तीन कंपनीचे मोबाईल नेटवर्क उपलबध आहे मात्र यामध्ये जिओ कंपणीचेच नेटवर्क सारखे सारखे बंद असते यामुळे दैनंदिन व्यवहारात प्रचंड मनस्ताप होत आहे त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घ्यावी -विक्रम घाटगे व्यापारी साखरवाडी