फलटण चौफेर दि २६ मे २०२५
साखरवाडी (ता. फलटण) येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बुद्ध विहाराच्या जागेसंदर्भात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवर व भीमसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले.
रामदास आठवले यांनी साखरवाडी येथे प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, संबंधित महिलांवर व युवकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच बुद्ध विहारासाठी योग्य ती जागा मिळावी यासाठी प्रशासनाशी चर्चा करून ती जागा मिळवून देण्याचा शब्दही त्यांनी दिला.या भेटीमुळे साखरवाडीतील भीमसैनिकांमध्ये आणि महिलांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.